National

  • img
    कोरेगाव जमिन प्रकरणावर अजित पवार हसत खेळत 'हे' काय बोलून गेले?

    मुलं सज्ञान झाल्यावर ते स्वतंत्र व्यवसाय करतात अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी प्रतिक्रिया दिल्यानंतर दिली. तसेच इतकंच नाही तर आपल्याला या व्यवहाराची दुरान्वयाने कल्पना नव्हती असंही अजित पवारांनी म्हटलं आहे. तसेच खरंतर खरेदीखतच व्हायला नको होतं. म्हणून मी मुख्यमंत्र्यांनाच सांगितले की नियमानुसार चौकशी होऊ द्या....

  • img
    निवडणूक आयोगाच्या विरोधात ठाकरे बंधू कोर्टात जाणार?

    मुंबई : एकीकडे मतदारयाद्यांतील घोळावर मनसे (MNS) आणि विरोधी पक्षांकडून मोर्चा काढण्यात येत असून दुसरीकडे कायदेशीर लढा लढण्यासाठीही पावले उचलली जात असल्याचं दिसतंय. निवडणूक आयोगाच्या विरोधात ठाकरे बंधू कोर्टात जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. येत्या दोन दिवसात त्यासंबंधी याचिका दाखल करण्यात येणार असून मतदार यादीमधील दोष पुराव्यासह कोर्टात सादर करणार असल्याची माहिती आहे....

  • img
    भारतासोबतचे संबंध ताणले, अनेक पाकिस्तानी सैन्याचा राजीनामा

    इस्लामाबाद: पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानचे संबंध ताणले गेले आहेत. पाकिस्तानचे गृहमंत्री, परराष्ट्रमंत्री भारताला थेट युद्धाच्या धमक्या देत आहेत. पण दुसरीकडे पाकिस्तानी सैन्याच्या मनोबलावर सातत्यानं परिणाम होत आहे. पाकिस्तानी लष्कराचे प्रमुख असीम मुनीर यांच्या कुटुंबियांनी देश सोडला आहे. वरिष्ठ पातळीवरील लष्करी अधिकाऱ्यांनी त्यांच्या कुटुंबांना युरोपियन देशांमध्ये पाठवलं आहे....

  • img
    भारताकडून शेतकऱ्यांना दोन दिवसांत शेत खाली करण्याचे आदेश, सरकार मोठ्या तयारीत?

    नवी दिल्ली : पहलगाम हल्ल्यानंतर पंजाबमधील भारत-पाकिस्तान सीमेवर अलर्ट जारी करण्यात आला आहे. BSF जवानांनी सुरक्षा आणि गस्त वाढवली आहे. अमृतसर, फिरोजपूर, गुरदासपूर, पठाणकोट हे जिल्हे पाकिस्तानच्या सीमेला लागून आहेत. भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढल्यामुळे BSF ने सीमेवरील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे आदेश जारी केले आहेत. शेतकऱ्यांनी कुंपणाजवळ लावलेली गव्हाची कापणी दोन दिवसांत पूर्ण करून शेत ...

  • img
    भारत हा पाकिस्तानातील दहशतवाद्यांवर हल्ला करण्याची शक्यता

    नागपूर : पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात पर्यटकांचा मृत्यू झाला. या घटनेचा बदला घेण्यासाठी भारत हा पाकिस्तानातील दहशतवाद्यांवर हल्ला करू शकतो. घटनेचं गांभीर्य लक्षात घेता आज केंद्र सरकारने सर्व दल बैठक बोलाविली. या बैठकीत ही माहिती देण्याची शक्यता आहे....

  • img
    वाघा बॉर्डर बंद, पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश

    नवी दिल्ली : पुढील 48 तासांत पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सिंधू जल करारावर स्थगिती देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला असून वाघा बॉर्डर 1 मे पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे....

  • img
    पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला, २० पर्यटकांच्या मृत्यू

    जम्मू-काश्मी : पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात आतापर्यंत 20 जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी बहुतेक जण हे पर्यटक होते. पर्यटकांना त्यांची नावं आणि धर्म विचारल्यानंत दहशतवाद्यांनी शिवीगाळ केली आणि अंधाधुंद गोळीबार केला. यामध्ये आतापर्यंत 20 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे....

  • img
    छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणांवर डोकं ठेवून माफी मागतो : पंतप्रधान मोदी

    पालघर : बंदर प्रकल्पाच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी माफी मागितली. तसेच सुमारे १ हजार ५६० कोटी रूपयांच्या २१८ मत्स्यपालन प्रकल्पांचेही उद्धाटन आणि पायाभरणी करण्यात आली. या उपक्रमांमुळे मासेमारी क्षेत्रातील पायाभूत सुविधा आणि उत्पादकता वाढेल, तसेच पाच लाख रोजगार निर्माण होतील, असे सांगण्यात आले....

Previous Post